vidnyan shap ki vardan marathi nibandh| विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध

vidnyan shap ki vardan marathi nibandh: आजच्या लेखनातून आपण विज्ञान शाप की वरदान या मराठी निबंधा विषयी माहिती घेणार आहोत.

आपल्या सर्व गरजा पुरविणारी, विविध रहस्य उलघडणारी, चमत्कारी मानली जाणारी शक्ती म्हणजे विज्ञान होय. विज्ञान म्हणजे आपल्याला लाभलेला परीस आहे. आपल्या भोवतालचा अज्ञानाचा अंधार विज्ञानाने जादूच्या कांडी प्रमाणे दूर केला. या विज्ञानाने मानवी जीवनात अनेक आमूलाग्र बदल घडवून आणले.

आज विज्ञान‌युगात माणूस आपली बहुतेक काम यंत्राच्या साहाय्याने करतो आहे, पण त्यामुळे कष्ट करण्याची त्यांची सवय कमी झाली आहे. परिणामी आज या सवय माणसांचे वजन वाढते. मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार वाढत्या प्रमाणात होताना आढळतात. अशा वेळी प्रश्न पडतो की, विज्ञान – शाप की वरदान ? विज्ञान च्या सहाय्यानं माणसाने अनेक वाहने निर्माण करून जीवन अधिक गतिमान बनवले. जली, स्थळी सहजतेने संचार करू लागला वेग वाढला, तसे अपघाताचही प्रमाण वाढले. पण त्याचबरोबर प्रदूषणात्चि संकट ओढवले. या वाहनातील इंधनामुळे हवा दुषित होत आहे. ध्वनीवर्धकामुळे ध्वनीप्रदूषण होते. व कारखान्यातील दुषित द्रव्ये नद्‌यांमध्ये सोडल्याने जलप्रदूषण केले जात आहे.Vidnyan shp ki vardan

vidnyan shap ki vardan marathi nibandh

विज्ञान’ रूपी कामधेनू मानवावर प्रसन्न झाली आणि मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाला. चाकाचा शोध लागल्यामुळे मानवी जीवनाला गती आली. सात महासागरांपल्याड पसरलेले जग जवळ आले. इतकेच नाही, तर अंतराळात झेप घेतली समुद्राचा थांग लावला ,संगणकामुळे तर आज मानवाने अप्राप्त गोष्टी प्राप्त केल्या. इंटरनेटच्या साहाय्याने दूरदूरच्या खंडात असलेली माणसे एकमेकांशी रोज बोलू लागली.

विज्ञानाची ही किमया श्रीमंतांपासून ते अगदी गरीबांपर्यंत पोहोचली आहे. माणसाने विज्ञानामुळे स्वतःचे कष्ट खूपच कमी केलेले आहेत. वैज्ञानिक क्षेत्रात अनेक शोध लावून असाध्य आजारांवर मात केली, अंधश्रध्दांवरही मात केली. हे सारे पाहिले की मन ग्वाही देते, विज्ञान मानवाला लाभलेले श्रेष्ठ वरदानच आहे

विज्ञान सुखद आहे तसेच माणसाच्या विनाशक सामर्थ्यवतात विज्ञानाने केलेली वाढ भयावह आहे. एका अणुबॉम्बने हिरोशिमातील हजारोंचे जीवन उध्वस्त केले. त्यामुळे पूर्वीची युद्‌धे व या काळातली युद्‌ये यांमध्ये फार मोठे अंतर पडले आहे.Mobile che fayde ani tote marathi nibandh
vidnyan shap ki vardan marathi nibandh

विज्ञानाने मानवाची शक्ती वाढवली, ऐश्वर्य वाढवले, पण बुद्‌धिमान माणसाने त्याचा वापर विधायक कामापेक्षाही विध्वंसक कामासाठी केला आहे.अणुविज्ञानाने अनेक भयानक आजारांवर मात केली. पण, अनुबॉम्बच्या निमित्तनि लक्षावधी निरापराध बळीही घेतला आहे. विज्ञान- शाप की वरदान ? हा प्रश्न खरे तर कोणीही विचारूच नये, कारण विज्ञान है एक साधन आहे. त्याचा वापर कसा करावा यावरून ते शाप अहि की वरदान हे समजणार आहे.

विज्ञान माणसासाठी शाप अहि की वरदान हे ठरवणार कसं ? जसे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसेच विज्ञानाचे फायदे आणि तोटेही आहेत मानवाच्या उत्क्रांतीमध्ये विज्ञानाचा खूप मोठा हात आहे. विज्ञानाने ज्याप्र‌माणे विकासाचे दिवस दाखवले त्याचप्रमाणे अनर्थ करण्याची ताकदही दिली. विज्ञानाने अणुबॉम्बसारख्या घातक अण्वस्त्रांचा शोध लावला, ज्यामध्ये मानवी प्रजाती समूळ नष्ट करण्याची ताकद आहे. जसे विज्ञान प्रगती करत गेले तसे औद‌योगिकीकरण वाढले, आणि पर्यावरणाचा ह्रास होण्यास सुरुवात झाली. मग हे विज्ञान फायदयाचे कसे?  (Vidnyan shap ki vardan marathi nibandh )      

विज्ञानाच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे.  साऱ्या वस्तू आपल्याला घरपोच मिळत आहेत. पण त्याचा दुष्परिणाम म्हणून  घरी येऊन गुन्हेगारीचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. तंत्रज्ञानामुळे एखाद्या माणसाची संपूर्ण माहिती चुटकी सरशी मिळून जाते. आणि त्याचा वापर चुकीच्या कामासाठी केला जातोय.

विज्ञानामुळे आरोग्य क्षेत्रामध्ये इतकी प्रगती केली आहे की आज आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार झाला तर तो लगेच विज्ञानाच्या जोरावरती आपण कमी करून घेऊ शकतो. पण याच प्रगतीमुळे त्याच गोळ्यांचे साईड इफेक्ट माणसाच्या आरोग्यावरती जाणू लागलेले आहेत. विज्ञानामुळे आपले जीवन सुखकर झाले पण आपल्या आयुष्यमान मात्र दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे
  

शेतीच्या क्षेत्रामध्ये तर आपण विज्ञानाच्या जोरावरती जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकत आहे. पण जो अन्नाचा दर्जा आहे तो मात्र दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे. आज आपण छोट्याशा जमिनीवरती इतके पीक घेऊ शकतो की आपण पूर्ण जनतेला अन्नदान करू शकतो.(Vidnyan shap ki vardan marathi nibandh)
     विज्ञानामुळे आपण पर्यावरणातील कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. पर्यावरणातील घातक गोष्टींचे रसायनाच्या जोरावरती आपण विल्हेवाट लावू शकतो. तसेच जैविक क्षेत्रामध्ये आपण दिवसेंदिवस प्रगत होत चाललेला आहे पण याचा पर्यावरणावरती भार देखील तितकाच वाढत आहे.
  

  वाढत्या प्रगत विज्ञानामुळे आज काल लोकांचे जॉब त्यांच्या हातून निघून चाललेले आहेत. दहा माणसांची कामे विज्ञानाने प्रगत असलेला एक रोबोट आरामात करू शकतो. तेव्हा मात्र या विज्ञानाच्या माणसाला नक्कीच फटका बसतो.  तसे बघायला गेले तर विज्ञान शाप की वरदान हे आपल्या वापरण्यावरती अवलंबून आहे त्याचा चांगला वापर करून घेतला तर नक्कीच आपण दिवसेंदिवस बघत होत जाऊ. मात्र त्याचा दुरुपयोग केला तर त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे( vidnyan shap ki vardan marathi nibandh)

   प्रगत विज्ञानामुळे आपल्याला भेटलेले मोबाईल यामुळे माणसे एकमेकांपासून दुरावत चाललेले आहेत. मोबाईल मुळे तर तरुण वर्ग तसेच लहान मुले चुकीच्या वळणावर पाऊल ठेवत आहे. आणि यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण समाजामध्ये वाढलेले आहे.
   निसर्गावरती सर्वात जास्त परिणाम विज्ञानाचा दिसून येतो मोबाईल इंटरनेट यांच्या रेडिएशनमुळे पक्षांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे. आली तर आपल्याला अंगणात बागडणार्‍या चिमण्या दिसून  येत नाही. आणि दुर्मिळ पक्षी यांचा ह्रास झालेला आहे. मानवी जीवनामध्ये प्रगत विज्ञानामुळे भरपूर सारा प्रमाणात मानसिक अशांतता पसरलेली आहे यामुळेच मानवी आयुष्यात नैराश्याला तोंड द्यावे लागते.

  ‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ या उक्तीप्रमाणे विज्ञान शाप की वरदान हे प्रत्येकाच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते  विज्ञानाचा योग्य उपयोग केला तर वरदानच आहे. माणसाने विज्ञानाच्या बळावर महाभयानक  शस्त्रास्त्रे निर्माण केली. त्यांतूनच आज दहशतवाद फोफावला आहे. माणसातला माणूस हरवला आहे आणि ती जास्तीत जास्त स्वार्थी बनत चालला अहि. माणूस निसर्गापासून दूर गेला. असून की तो सुखी हे पाहिले की प्रश्न शाप आहे वरदान ?’ आहे याबाबत संशयच आहे. पडतो की, खरोखरच ‘विज्ञान शाप आहे की वरदान?( Vidnyan shp ki vardan marathi nibandh)

हल्लीच निर्माण झालेले कोरोणा संकट तर आपण सगळ्यांनीच पाहिलेले आहे. कोरोनाचे संकट विज्ञानामुळे आले आहे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. कोरोनाची लस प्रगत विज्ञानामुळे आपण तयार केली. पण ती लगेच घेतल्यानंतर साधारणता एक ते दोन वर्षानंतर मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम दिसू लागलेले आहेत. अंगदुखी कमी वयामध्ये हार्ट अटॅक , बीपी शुगर यांचे प्रमाण वाढलेले दिसून आलेले आहे. त्यामुळे विज्ञान हे शाप आणि वरदान या दोन नाण्याच्या बाजू आहेत.

निसर्गाचा तरी मानवाने मोठ्या प्रमाणावर छळ केला निसर्गाने दिलेल्या अमृतरूपी औद्योगिक क्रांतिचे रूपांतर प्रदुषणरूपी महाभयंकर राक्षसात केले. वनांची व वन्यजीवांना मारून मानवाने निसर्गाचा समतोल बिघडवुन टाकला.

महात्मा गांधी हे एका उत्तीमध्ये म्हणाले की, ‘निसर्ग आपल्याला पोटभर देतो. फक्त मानवाने आपली भूक आवरली पाहिजे.”Vidnyan shap ki vardan marathi nibandh

vidnyan shap ki vardan marathi nibandh

अधिराज्य गाजवणे हे प्रत्येकाचे स्वप्न आहे. त्यासाठी विज्ञानाचा स्वार्थीपणाने वापर होत आहे. याला मानवाची बदललेली मानसिक‌ता, स्वार्थ कारणीभूत आहेत. निसरगाने आपल्या प्रत्येक गरजेला हाक दिली आहे व पुढेही देत राहील .विज्ञानाला शाप म्हणणारी व बनवणारी ही मानवाची वृत्ती आहे. हेच विज्ञान प्रत्येकाच्या मनी रुजू दे हीच इच्छा.

विज्ञानाला घेवून संगे फेडा निसर्ग ऋण

फक्त वापरावे ते जपून!

धन्यवाद

( vidnyan shap ki vardan marathi nibandh)

पाणी वाचवा निबंधासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा=. https://knowledge.org.in/save-water-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%b5%e0%a4%be/

Vidnyan shap ki vardan https://youtu.be/w_PbRP7Wgcw?si=6MlOW5TQ0Ni4MwGB